5 September | 5 सप्टेंबर दिनविशेष, शिक्षक दिन (Teachers’ Day)

5 September

5 सप्टेंबर दिनविशेष, शिक्षक दिन (Teachers’ Day)

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- मंगळवार

दिनांक- 05/09/2023, 5 सप्टेंबर

मिती-  श्रावण कृष्ण 6

शके– 1945

सुविचार- उगवणारा प्रत्येक दिवस उमलणारा हवा.

म्हणी व अर्थ :

कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ-
अर्थ :~ आपल्याच हातून आपल्या जातभाईंचे नुकसान होणे.
वाक्प्रचार-  तक्रार करणे – फिर्याद करणे.
5 Septemberश, 5 सप्टेंबर दिनविशेष, शिक्षक दिन (Teachers’ Day)

ठळक घटना आणि घडामोडी

सप्टेंबर ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २४७ वा किंवा लीप वर्षात २४८ वा दिवस असतो.

शिक्षक दिन

हा शिक्षकांच्या कौतुकाचा एक विशेष दिवस आहे आणि एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील त्यांच्या विशेष योगदानाबद्दल किंवा सामान्यत: समुदायामध्ये त्यांचा सन्मान करण्यासाठी उत्सवांचा समावेश असू शकतो.

शिक्षक दिन साजरा करण्याची कल्पना १९व्या शतकात अनेक देशांमध्ये रुजली; बहुतेक प्रकरणांमध्ये, ते स्थानिक शिक्षक किंवा शिक्षणातील महत्त्वाचा टप्पा साजरा करतात. इतर अनेक आंतरराष्ट्रीय दिवसांपेक्षा भिन्न देश हा दिवस वेगवेगळ्या तारखांना साजरा करण्याचे हे प्राथमिक कारण आहे. उदाहरणार्थ, अर्जेंटिनाने १९१५ पासून ११ सप्टेंबर रोजी डॉमिंगो फॉस्टिनो सर्मिएन्टोच्या मृत्यूचे स्मरण शिक्षक दिन म्हणून केले आहे. भारतात दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन (५ सप्टेंबर) यांचा जन्मदिवस १९६२ पासून शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. २०२२ मध्ये शिक्षक दिन “अभार दिवस” ​​म्हणून साजरा करण्यात आला.

१९९४ मध्ये युनेस्कोने स्थापन केलेल्या जागतिक शिक्षक दिनासोबत अनेक देश ५ ऑक्टोबर रोजी त्यांचा शिक्षक दिन साजरा करतात.

सर्वपल्ली राधाकृष्णन

५ सप्टेंबर १८८८ – १७ एप्रिल १९७५) हे एक भारतीय तत्त्वज्ञ आणि राजकारणी होते. त्यांनी १९६२ ते १९६७ पर्यंत भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून आणि १९५२ ते १९६२ पर्यंत भारताचे पहिले उपराष्ट्रपती म्हणून काम केले. ते १९४९ ते १९५२ पर्यंत सोव्हिएत युनियनमधील भारताचे दुसरे राजदूत देखील होते. तसेच १९३९ ते १९४८ पर्यंत ते बनारस हिंदू विद्यापीठाचे चौथे कुलगुरू होते.

राधाकृष्णन हे विसाव्या शतकातील तुलनात्मक धर्म आणि तत्त्वज्ञानाचे सर्वात प्रतिष्ठित विद्वानांपैकी एक होते. [३] [web १] ते १९२१ ते १९३२ या काळात कलकत्ता विद्यापीठातील किंग जॉर्ज पंचम मानसिक आणि नैतिक विज्ञान या विभागाचे अध्यक्ष होते. तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठातील पूर्व धर्माचे स्पॅल्डिंग चेअर आणि नैतिकता विभागाचे १९३६ ते १९५२ पर्यंत ते अध्यक्ष होते.

राधाकृष्णन यांचे तत्त्वज्ञान अद्वैत वेदांतावर आधारित होते. त्यांनी या परंपरेची समकालीन आकलनासाठी पुनर्व्याख्या केली. [web १] ज्याला ते “अज्ञात पाश्चात्य टीका” म्हणायचे, त्याच्यापासून त्यांनी हिंदू धर्माचा बचाव केला. समकालीन हिंदू ओळख निर्माण करण्यात राधाकृष्णन यांनी योगदान दिले.

भारत आणि पश्चिम जग अशा दोन्ही देशांमध्ये हिंदू धर्माची समज निर्माण करण्यात त्यांचा मोठा प्रभाव होता. भारत आणि पश्चिम जग यांच्यामध्ये पूल बांधणारी व्यक्ती म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला.

राधाकृष्णन यांना त्यांच्या आयुष्यात अनेक उच्च पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. १९३१ मध्ये नाइटहूड, १९५४ मध्ये भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला भारतरत्न आणि १९६३ मध्ये ब्रिटिश रॉयल ऑर्डर ऑफ मेरिटचे मानद सदस्यत्व त्यांना बहाल केले गेले.

हेल्पेज इंडिया या भारतातील वृद्ध वंचितांसाठी एक ना-नफा संस्था असलेल्या संस्थापकांपैकी ते एक होते. राधाकृष्णन यांचा असा विश्वास होता की “शिक्षक हे देशातील सर्वोत्तम बुद्धिवंत असावेत.” १९६२ पासून,

त्यांचा जन्मदिवस भारतात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

विसावे शतक

  • १९०५ – रशिया-जपान युद्ध-अमेरिकन राष्ट्राध्यक्ष थियोडोर रूझवेल्टच्या मध्यस्थीने न्यू हॅम्पशायर राज्यात जेता जपान व रशियात संधी.
  • १९१४ – पहिले महायुद्ध-पॅरिसवर चाल करून आलेल्या जर्मन सैन्याला फ्रेंच सैन्याने मागे रेटले.
  • १९१५ – झिमरवाल्ड परिषद सुरू.
  • १९३२ – बर्किना फासोच्या वसाहतीचे आयव्हरी कोस्ट, माली व नायजर या राष्ट्रांत विभाजन.
  • १९३७ – स्पॅनिश गृहयुद्ध-लेन्स शहर फ्रँकोच्या ताब्यात.
  • १९३९ – दुसरे महायुद्ध-अमेरिकेने आपण तटस्थ असल्याचे जाहीर केले.
  • १९४२ – दुसरे महायुद्ध-मिल्ने बेची लढाई-जपानच्या आरमाराने माघार घेतली.
  • १९४४ – दुसरे महायुद्ध-बेल्जियम, नेदरलँड्स व लक्झेंबर्ग मिळून बेनेलक्स तयार झाले.
  • १९६१ – अलिप्त राष्ट्रांची पहिली परिषद बेलग्रेड येथे सुरू.
  • १९७२ – ब्लॅक सप्टेंबर नावाने वावरणाऱ्या पॅलेस्टाईनच्या अतिरेक्यांनी म्युनिक हत्याकांड-म्युनिकमधील ऑलिंपिक खेळात भाग घेणाऱ्या इस्रायेलच्या खेळाडूंना ओलिस ठेवले.
  • १९७५ – कॅलिफोर्नियातील साक्रामेंटो शहरात अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जेराल्ड फोर्डवर असफल खूनी हल्ला.
  • १९७७ – व्हॉयेजर १ या अंतराळयानाचे प्रक्षेपण.
  • १९८० – स्वित्झर्लंडमधील सेंट गॉट्टहार्ड बोगदा खुला.
  • १९८४ – एस.टी.एस. ४१-डी-स्पेस शटल डिस्कव्हरीने आपली पहिली अंतराळयात्रा पूर्ण केली.
  • १९८६ – कराची आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पॅन ऍम फ्लाइट ०७३चे अपहरण.

एकविसावे शतक

  • २००५ – मंडाला एरलाइन्स फ्लाइट ०९१ हे बोईंग ७३७-२०० प्रकारचे विमान इंडोनेशियातील सुमात्रा बेटावरील दाट वस्तीच्या भागात कोसळले. विमानातील १०४ व जमीनीवरील ३९ व्यक्ती ठार.

जन्म

  • ११८७ – लुई आठवा, फ्रांसचा राजा.
  • १६३८ – लुई सोळावा, फ्रांसचा राजा.
  • १८२६ – जॉन विस्डन, ब्रिटीश क्रिकेटरसिक, प्रकाशक.
  • १८४७ – जेसी जेम्स, अमेरिकन दरोडेखोर.
  • १८५७ – कॉन्स्टेन्टिन त्चियाकोव्स्की, रशियन संशोधक.
  • १८८८ – सर्वपल्ली राधाकृष्णन, भारताचे राष्ट्रपती.
  • १९०९ – आर्ची जॅक्सन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९१० – फिरोझ पालिया, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९२३ – केन म्युएलमन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९४० – राकेल वेल्च, अमेरिकन अभिनेत्री.
  • १९४६ – फ्रेडी मर्क्युरी, ब्रिटीश संगीतकार.
  • १९४७ – ब्रुस यार्डली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९५१ – मायकेल कीटन, अमेरिकन अभिनेता.
  • १९५४ – रिचर्ड ऑस्टिन, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
  • १९६९ – मार्क रामप्रकाश, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९७१ – ऍडम होलिओके, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९७२ – गाय व्हिटॉल, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९७४ – रॉल लुईस, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
  • १९७८ – सिल्व्हेस्टर जोसेफ, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

  • ११६५ – निजो, जपानी सम्राट.
  • १८७७ – क्रेझी हॉर्स, अमेरिकेतील सू जमातीचा नेता.
  • १९०६ – लुडविग बोल्ट्झमन, ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९९७ – मदर तेरेसा, समाजसेविका.

प्रतिवार्षिक पालन

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

संपू दे अंधार सारा
उजळू दे आकाश तारे
गंधाळल्या पहाटेस येथे
वाहू दे आनंद वारे….
जाग यावी सृष्टीला की*
होऊ दे माणूस जागा
भ्रष्ट सारे नष्ट व्हावे
घट्ट व्हावा प्रेम धागा…
स्वच्छ सारे मार्ग व्हावे
अन् मने ही साफ व्हावी
मोकळ्या श्वासात येथे
जीवसृष्टी जन्म घ्यावी…
स्पंदनांचा अर्थ येथे
एकमेकांना कळावा
ही सकाळ रोज यावी
माणसाचा देव व्हावा…
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

 विवेकबुध्दी
‘पन्नास रुपयांचे पेढे, पंधरा रुपयांचा नारळ, दहा रुपयांचा हार, एक रुपया चप्पल सांभाळण्याराला आणि पाच रुपये दान पेटीत’ एवढे करुन आपण देवापर्यंत पोहोचतो का?
याचा आपण नेहमी विचार करावा. देवापर्यंत तेव्हाच पोहोचू जेव्हा प्रत्येक गोष्टीत आपल्याला ते परमेश्वरीय तत्व जाणवेल. तेव्हा एखाद्या प्रसंगाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलेल.
यावरुन एक कहाणी ऐकलेली आठवली. त्याचा संदर्भ गुरु ग्रंथ साहिबमध्ये येतो. ती कहाणी ऐकली आणि मनावर कायमची प्रभाव ठेवून गेली .
कहाणी आहे राजा रणजीतसिंग यांची. त्यांची जगज्जेता होण्याची इच्छा होती व तसा त्यांचा पराक्रमही होता. लहोरी जिंकून ते आपल्या सेनेसह राज्यात परत येत असताना एक जंगल लागले.
जंगलात एक म्हातारी जमिनीवरील दगड उचलून समोरच्या बोराच्या झाडावर मारीत होती व बोरे पडल्यावर त्याचे ढीग करुन ठेवीत होती. तिला राजेसाहेब जात असल्याची काहींच कल्पना नव्हती. तिचे दगड मारणे चालूच होते.
तेवढ्यात,
तिने मारलेला एक दगड रणजीतसिंग यांच्या कपाळावर लागला आणि रक्ताची धार वाहू लागली. सैनिक सतर्क झाले व मारणा-याचा शोध घेऊ लागले.
रणजीतसिंगाला दगड मारणारी म्हातारी दिसताच तिला पकडून त्यांनी महाराजांसमोर उभे केले. म्हातारीला परिस्थिती लक्षात आली. ती गयावया करुन म्हणाली, “महाराज  आपण इथे असल्याचे मला माहित नव्हते.
रोजच्या प्रमाणे मी बोरे गोळा करीत होते. रोज ही बोरे विकून जे पैसे मिळतात त्यावर माझ्या कुटुंबांचे उदरभरण होते. मी आपल्याला जाणूनबुजून नाही मारले. मला क्षमा करावी महाराज.” असे म्हणून तिने रणजीतसिंगांचे पाय धरले .
सेनापती व सेना ‘आता म्हातारीला देहदंडाची शिक्षा महाराज देतील’ याची वाट बघत होते. रणजीतसिंगांना म्हातारीच्या परिस्थितीची जाणीव झाली. ते सेनापतीकडे वळून म्हणाले, “एक सोन्याच्या मोहरा भरलेली थैली घेऊन या.”
थैली आल्यावर ती त्यांनी म्हातारीला दिली व तिला जाण्यास सांगितले.
सेनापती व सेनेला आश्चर्य वाटले. न राहवून सेनापती महाराजांना म्हणाले, “महाराज, त्या म्हातारीला कठोर शिक्षा करायचे सोडून आपण तिला मोहरांचे इनाम का दिले महाराज?”
त्यावर महाराज उत्तरले –
“अरे, दगड मारल्यावर ते बोराचे झाड जर गोड बोरे देते तर,  रणजीतसिंगाने त्याहून काही कमी देणे शोभले असते का..??”
तात्पर्य:~
आपल्या जीवनातसुद्धा असे प्रसंग अनेकदा येतात. त्या वेळी आपण आपली सद्सद्विवेकबुद्धी जागी ठेवून वागले पाहिजे.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

स्वर्गाहुनही प्रिय आम्हांला अमुचा सुंदर भारत देश
आम्ही सारे एक, जरीही नाना जाती, नाना वेष
या भूमीच्या आम्ही कन्या, कोमल भाव मनी
फूलकोवळ्या तरी प्रसंगी होऊ रणरागिणी
आवेशाने घुसू संगरी चढवुनिया रणवेष
श्रीरामाचे, शीकृष्णाचे अजून आहे स्मरण मनास
वीर शिवाजी, प्रताप, बाजी.. थोर आमुचा हा इतिहास
रक्तामधुनी वीज वाहते उरात भरतो नव आवेश
हिमायलापरि शीतल आम्ही, आग पेटती परि उरात
पाऊल परके पडता येथे बळ वज्राचे याच करांत
या देशाची गौरवगाथा हाच अम्हाला दे आदेश

बालगीत

आपडी थापडी
आपडी थापडी गुळाची पापडी
धम्मक लाडू तेल काढू !
तेलंगीचे एकच पान दोन हाती धरले कान !
चाउ माउ चाउ माउ !
पितळीतले पाणी पिऊ हंडा पाणी गडप !
गुळाची पापडी हडप !

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

✪  ‘उत्तर भारताचे मॅंचेस्टर’  असे कोणत्या शहराला संबोधतात ?
  ➜ कानपूर.
 ✪  साखरेच्या उत्पादनात प्रथम क्रमांकावर असलेले राज्य कोणते ?
  ➜ महाराष्ट्र.
 ✪  भारताला स्वातंञ्य मिळाले तेव्हा अरूणाचल प्रदेशाचे नाव काय होते ?
  ➜नेफा. ( नाॅर्थ ईस्ट फ्रॅंटियर एजन्सी )
 ✪  भारतातील कोणत्या राज्यात आदिवासी विद्यापीठ उभारल्या जात आहे ?
  ➜मध्यप्रदेश. ( अमरकंटक )
 ✪  ‘मावसिनराम’ हे सर्वांधिक पर्जन्यासाठी ज्ञात असलेले गाव कोणत्या राज्यात आहे ?
  ➜ मेघालय.

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#5 september,5 september 2023, 5 september 2021 panchang, 5 september 2022 special day, 5 september 2023 weather, 5 september 2022 panchang in hindi,5 september is celebrated as, what is celebrated on 5 september, 5 september 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.