29 डिसेंबर दिनविशेष | सप्तरंगी परिपाठ,Daily Routine

29 डिसेंबर दिनविशेष

सप्तरंगी परिपाठ

आज वार- गुरुवार, दिनांक- 29/12/2022,

मिती- पौष शुक्ल सप्तमी, शके-1944

सुविचार –
स्वाभिमानाचा लिलाव करुन मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं,कधीही चांगलं…!

वाक्प्रचार-

मनाई असणे- बंदी असणे

म्हणी व अर्थ –
उभ्याने यावे आणि ओणव्याने जावे.
अर्थ :- येते वेळी ताठ मानेने यावे आणि जाते वेळी खाली मान घालून जाणे.

आजचा दिनविशेष-

ठळक घटना आणि घडामोडी

एकोणिसावे शतक-

१८१३ – १८१२ चे युद्ध – ब्रिटीश सैनिकांनी बफेलो, न्यूयॉर्क जाळले.

१८३५ – न्यूएकोटाचा तह – चेरोकी जमातीची मिसिसिपीच्या पूर्वेची सगळी जमीन अमेरिकेच्या स्वाधीन.

१८४५ – टेक्सास अमेरिकेचे २८वे राज्य झाले.

१८६२ – अमेरिकन यादवी युद्ध – चिकासॉ बायूची लढाई संपली.

१८९० – युनाइटेड स्टेट्स सेव्हन्थ कॅव्हेलरी(अमेरिकेचे ७वे घोडदल) कडून सू राष्ट्राच्या ४०० पुरुष, स्त्री व बालकांची वुन्डेड नी येथे कत्तल.

१८९१ – थॉमस अल्वा एडिसनने रेडियोसाठी पेटंट मिळविला.

विसावे शतक-

१९११ – सुन यात्सेन चीनच्या प्रजासत्ताकचा पहिला राष्ट्राध्यक्ष झाला.

१९१२ – विल्यम ल्योन मॅकेन्झी किंग कॅनेडाच्या पंतप्रधानपदी.

१९३४ – जपानने १९२२ च्या वॉशिंग्टन नाविकी तह व १९३० च्या लंडन नाविकी तहातून अंग काढून घेतले.

१९३७ – आयरीश मुक्त राज्य संपुष्टात. त्याऐवजी आयर्लंडहा देश अस्तित्वात.

१९४० – दुसरे महायुद्ध-ब्रिटनची लढाई – लुफ्तवाफेने लंडनवर जबर बॉम्बफेक केली. ३,००० नागरिक ठार.

१९७२ – ईस्टर्न एरलाइन्सचे लॉकहीड ट्रायस्टार जातीचे विमान फ्लोरिडात मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना कोसळले. १०१ ठार.

१९७५ – न्यूयॉर्कच्या लाग्वार्डिया विमानतळावर बॉम्बस्फोट. ११ ठार.

१९८९ – वाक्लाव हावेल चेकोस्लोव्हेकियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.

१९९२ – ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्ष फर्नान्डो कोलोर डी मेलोने राजीनामा दिला.

१९९४ – माझगाव डॉकने तयार केलेली क्षेपणास्त्र वाहक नौका भा.नौ.द. नाशक भारतीय नौदलात दाखल.

१९९८ – ख्मेर रूजच्या नेत्यांनी कंबोडियातील वंशहत्येबद्दल जगाची माफी मागितली. या प्रकारात १०,००,०००हून अधिक माणसांना मारण्यात आले होते.

एकविसावे शतक-

२००१ – पेरूची राजधानी लिमाच्या ऐतिहासिक मध्यवर्ती भागात आग. २७४ ठार.

२००५ – बंगलोरच्या भारतीय विज्ञान संस्थेत गोळीबार. एक शास्त्रज्ञ ठार, ४ जखमी.

जन्म-

१७०९ – रशियाची एलिझाबेथ, रशियाची साम्राज्ञी.

१८०० – चार्ल्स गुडईयर, अमेरिकन शोधक व उद्योगपती.

१८०८ – ऍन्ड्र्यू जॉन्सन, अमेरिकेचा १७वा राष्ट्राध्यक्ष.

१८०९ – विल्यम इवार्ट ग्लॅड्स्टोन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.

१८४४ – उमेशचंद्र बॅनर्जी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा पहिला अध्यक्ष, वकील.

१९०० – मास्टर दीनानाथ मंगेशकर, भारतीय नट, गायक.

१९०४ – कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ ’कुवेम्पू’ – ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी

१९१७ – रामानंद सागर, भारतीय चित्रपट निर्माता-दिग्दर्शक.

१९४२ – राजेश खन्ना भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते.

१९६० – डेव्हिड बून ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

मृत्यू-

१९६७ – पंडित ओंकारनाथ ठाकूर, भारतीय गायक, संगीतज्ञ.१९५५ मधे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

१९७१ – दादासाहेब गायकवाड डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी.

२०१२ – टोनी ग्रेग, इंग्लिश क्रिकेट खेळाडू व समालोचक

राष्ट्रगीत-

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

प्रतिज्ञा-

भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा

आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद

प्रार्थना-

केशवा, माधवा, तुझ्या नामात रे गोडवा |

तुझ्यासारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा |
वेळोवेळी संकटातुनी तारिशी मानवा |

वेडा होऊन भक्तीसाठी, गोपगड्यांसह यमुनाकाठी |
नंदाघरच्या गाई हाकिशी गोकुळी यादवा |

वीर धनुर्धर पार्थासाठी, चक्र सुदर्शन घेऊन हाती |
रथ हाकुनिया पांडवांचा पळविशी कौरवा |

बडबडगीत

उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजूनही अजूनही ।।धृ।।

सोनेरी हे दूत आले
घरट्याच्या दारापाशी
डोळ्यांवर झोप कशी
अजूनही अजूनही ।।१।।

लगबग पाखरे ही
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहीकडे चोहीकडे ।।२।।

झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचे मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या चिमुकल्या ।।३।।

बाळाचे मी घेता नाव
जागी झाली चिऊताई
उठोनिया दूर जाई
भूर भूर भूर भूर ।।४।।

बोधकथा-

सकारात्मक खोटे
एका शेतकऱ्याच्या पिकांचे खूप नुकसान झाले होते. त्याच्या घरात अन्नाचा कणही शिल्लक नव्हता. गावात त्याला मदत पण करीत नव्हते काय करावे म्हणून शेतकरी विचार करीत राहिला.
काहीच उपाय सुचला नाही तेंव्हा त्याने गावातील सावकाराची गाय चोरली. सकाळी त्या गायीचे दुध आपल्या मुलांना पाजले व त्यांची भूक भागविली. सावकाराच्या नोकरांना गाय चोरल्याचे कळल्यावर त्यांनी चोरीची तक्रार केली.
सावकाराने पंचायतीमध्ये शेतकऱ्याला बोलावले व विचारले,”ही गाय तू कुठून आणली आहे? ” शेतकरी म्हणाला,”ही गाय मी खरेदी केली आहे.”
पंचानी कसून चौकशी केल्यावर सुद्धा शेतकरी त्याच उत्तरावर ठाम राहिला. त्यानंतर पंचानी सावकाराला विचारले, ही गाय खरेच आपली आहे का?
सावकाराने क्षणभरच शेतकऱ्याकडे पाहिले आणि शेतकऱ्याने आपली नजर खाली झुकविली, सावकाराने पंचांना सांगितले,” ही गाय माझी नाही, माझ्याकडून गायीला ओळखण्यात चूक झाली आहे.” पंचानी शेतकऱ्याला दोषमुक्त केले.
घरी पोहोचल्यावर सावकाराच्या नोकरांनी सावकाराला खोटे बोलण्याचे कारण विचारले तेंव्हा सावकार म्हणाला,” ती गाय आपली आहे हे मला व त्या शेतकऱ्याला दोघानाही माहित आहे. पण त्या क्षणी मला शेतकऱ्याचा डोळ्यात विवशता, भुकेची जाणीव आणि केलेल्या चोरीचा पश्चाताप असे एकत्रित भाव दिसले.
मी त्याच्यावर आलेल्या संकटाचे गांभीर्य ओळखून खोटे बोललो. मी जर खरे बोललो असतो तर त्याला शिक्षा होवून त्याचे कुटुंब उघड्यावर आले असते त्यापेक्षा मी त्याला खोटे बोलून वाचविले.
तात्पर्य:- एखादा संकटात असेल तर त्याला वाचविण्यासाठी आपण प्रत्येक शक्य ते प्रयत्न करणे गरजेचे आहे.

 प्रश्नमंजुषा

_ टेलिफोनचा शोध कोणी लावला ?
-ग्रॅहम बेल
_ महाराष्ट्रतील कोणत्या ठिकाणी अणुवीज केंद्र आहे ?
-तारापूर
_कानिफनाथ महाराज समाधी स्थळ कोठे आहे ?
-मढी (अहमदनगर)
_बालिका दिवस हा कधी असतो?
-३ जानेवारी
_भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे ?
-पुणे
_उन्हाळ्यात कोणती फळे बाजारात भरपूर असतात ?
-आंबे व कलिंगडे
_पावसाळ्याची चाहूल लागते तोपर्यंत कोणती फळे बाजारात आलेली असतात?
-फणस, करवंदे आणि जांभळे
_हिवाळ्यात आंब्याच्या झाडाला फुलोरा येतो त्यास काय म्हणतात?
-मोहर
_थंडीचा कडाका कोणत्या महिन्यात कमी होतो?
-फेब्रुवारी
_उष्णता कोणत्या महिन्यात जाणावयाला सुरूवात होते?
-मार्च
_Which is the national bird of India?
-Peacock
_Which is the state bird of Maharashtra?
-Green Pigeon
_Which bird flies the highest in the sky?
-Kite
_Who is called the king of birds?
-Eagle
_Which is the fastest bird on land?
-Ostrich

व्यक्तीविशेष-

दीनानाथ मंगेशकर-
दीनानाथ मंगेशकर हे मराठी गायक, अभिनेते, संगीतकार होते. तेजस्वी, पल्लेदार, धारदार आवाज, सूरनळ्यातून रंगीबेरंभी स्फुल्लिग उडून यावे अशाप्रकारे गळयातून बाहेर पडणाऱ्या ताज्या सुंदर, ढंगदार चिजा, ठुमऱ्या, दादरे या गायकीच्या गुणांबरोबरच आवाजातील उंची, रूंदी, जोर या गुणांचे मिश्रण ज्यांच्या आवाजात आढळत असे, ते ज्येष्ठ श्रेष्ठ गायक दीनानाथ गणेश मंगेशकर. दीनानाथांचा जन्म गोमांतकातील मंगेशी या गावी २९ डिसेंबर १९०० रोजी झाला.
मंगेशी गावावरून त्यांचे उपनाव मंगेशकर असे पडले असले तरी त्यांचे मूळचे आडनाव अभिषेकी होते. दीनानाथ दिसायला सुंदर, नाकी डोळे तरतरीत आणि लोभस चेहऱ्याचे होते. – त्यांचे शालेय शिक्षण फारसे झाले नाही पण तेथील ब्राह्मणांचे मंत्र पठण ऐकून ते मुखोद्गत केल्यामुळे त्यांच्या वाणीवर, उच्चारांवर आपोआपच सुसंस्कार झाले.

कार्य-

त्यात मूळचा आवाज अतिशय गोड आणि धारदार होता. बालपणापासूनच त्यांना गाण्याची आवड होती. त्यांचा गाण्याचा छंद पाहून गणेशपंतांनी दीनानाथांना बाबा माशेलकर या संगीत शिक्षकाकडे रागदारीचे पहिले धडे घेण्यास पाठविले. गावात ह. भ. प. जोगबुवा यांच्या कीर्तनाच्या वेळी हातात झांजा घेऊन दीनानाथ आपल्या गोड आवाजाने बुवांना साथ देत असे. त्यामुळे त्यांचा लौकिक पंचक्रोशीत पसरला.
१९१३ साली किर्लोस्कर संगीत मंडळीत फाटाफूट झाली. बालगंधर्व त्यातून बाहेर पडले. त्यामुळे त्यांच्या मराठी सृष्टी साहित्य, कला, उद्योग, मनोरंजन जागेवर देखणा आणि गाणारा नवीन मुलगा हवा होता. व्यंकटराव पनवेलकर यांनी दीनानाथांना किर्लोस्करमध्ये नेले आणि दरमहा तीस रुपये वेतनावर ते त्यांच्या नाटकातून काम करू लागले.
त्यांनी अनेक नाटकातून स्त्री भूमिका केल्या. शाकुंतल मधील शकुंतला, शारदेतील शारदा, सुंदोपसुंद मधील सुविप्रभा, ताजेवफामधील कमलाची भूमिका या त्यांच्या गाजलेल्या स्त्री भूमिका. त्यानंतर त्यांचे अतिशय गाजलेले नाटक म्हणजे ‘पुण्यप्रभाव’ नंतर ब वंत संगीत मंडळीतर्फे गडकऱ्यांचे ‘भावबंधन’ रंगभूमीवर आले. आणि त्यातील नायिकेची – लतिकेची भूमिका दीनानाथांनी आपल्या गायनाभिनाच्या बळावर अतिशय गाजवली.
अंगात ओव्हर कोट घालून डोक्यावर स्कार्फ घेतलेल्या फॅशनेबल लतिकेच्या वेषात ते फार सुंदर दिसत असत. भावबंधनमध्ये ‘कठीण ‘कठीण कठीण किती’ हे त्यांनी म्हटलेले गाणे महाराष्ट्रात घराघरात पोहोचले. त्यानंतर ‘एकच प्याला’, ‘राजसंन्यास’, ‘वेड्यांचा बाजार’, ‘रणदुंदुभी’
मधील ‘परावशता पाश दैवे’, ‘जगीया खास वेड्यांचा’, ‘दिव्य स्वातंत्र्यरवी’ ही त्यांनी म्हटलेली गाणी त्या काळात तर खूपच गाजली. पण आजही मराठी मन या गाण्यांवर फिदा आहे.
तसेच धैर्यधीराच्या भूमिकेतील ‘शूरा मी वंदिले’ आणि ‘रवि मी चंद्र कसा’ ही नाट्यपदेही त्यांच्या गळ्यातून अजरामर झाली. दीनानाथांचे महाराष्ट्राला आणखी एक देणे म्हणजे त्यांनी पाच गंधर्व स्वरांची अपत्ये महाराष्ट्राला दिली. लता मंगेशकर, आशा भोसले, मीना खर्डीकर, उषा मंगेशकर आणि पं. हृदयनाथ मंगेशकर. या सगळ्यांनी आपल्या पित्याचा वारसा फक्त पुढे चालवला असे नाही तर तो जगाच्या नकाशावर अजरामर केला.
बलवंत संगीत मंडळी पडल्यावर ते पुण्यात येऊन राहिले. रक्तदाबाच्या विकाराने ते २४ एप्रिल १९४२ रोजी दिवंगत झाले. महाराष्ट्राच्या नट श्रेष्ठाला आदरांजली !

पसायदान-

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

मनाचे श्लोक

नको रे मना क्रोध हा खेदकारी । नको रे मना काम नाना विकारी ॥
नको रे मना सर्वदा अंगिकारू । नको रे मना मत्सरू दंभ भारू ॥
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे। मना बोलणे नीच सोशीत जावे ॥
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे । मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥
देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी । मना सज्जना हेचि क्रीया धरावी ॥
मना चंदनाचे परी त्वां झिजावे । परी अंतरी सज्जना नीववावे ॥
नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे। अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे ॥
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे। न होता मनासारखे दुःख मोठे ॥
सदा सर्वदा प्रीति रामी धरावी। सुखाची स्वये सांडि जीवी करावी ॥
देहेदुःख ते सूख मानीत जावे। विवेके सदा स्वस्वरूपी भरावे ॥

देशभक्तीपर गीत-

मंगल देशा 

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा

प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ||

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा

नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा

अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा

बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा

भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा

शाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा

ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी;

जोडी इह पर लोकांसी, व्यवहारा परमार्थासी,

वैभवासि, वैराग्यासी

जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा

प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ॥१॥

अपार सिंधुच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा

सह्याद्रीच्या सख्या, जिवलगा, महाराष्ट्र देशा

पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा

गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा

तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची

मंगल वसती जनस्थानिंची श्रीरघुनाथांची

ध्येय जे तुझ्या अंतरी ॥२॥

मराठी परिपाठ

परिपाठ सुविचार,
Marathi paripath pdf,
परिपाठ दाखवा,
परिपाठ म्हणजे काय?,
Marathi paripath sutrasanchalan,
आजचा दिनविशेष,
दिनविशेष,
आजचा दिनविशेष मराठी,
मराठी दिनविशेष,
इतिहासातील जागतिक दिवस,
ठळक घटना,
वाढदिवस,
स्मृती दिवसांची संदर्भासहित

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.