Site icon Active Guruji

27 डिसेंबर दिनविशेष | सप्तरंगी परिपाठ, Daily Routine

27 डिसेंबर दिनविशेष

सप्तरंगी परिपाठ

आज वार-मंगळवार, दिनांक- 27/12/2022

मिती- पौष शुद्ध पंचमी, शके-1944

सुविचार- गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र.                          

आजचा दिनविशेष-

ठळक घटना आणि घडामोडी

अठरावे शतक-

१७०३ – पोर्तुगाल व इंग्लंडने मेथुएनच्या तहावर सही केली. पोर्तुगालहून आयात केलेल्या मद्याला (वाइनला) इंग्लंडमध्ये प्राधान्य.

एकोणिसावे शतक-

१८३१ – चार्ल्स डार्विन एच.एम.एस. बीगल या जहाजातून गॅलापागोसला जाण्यास निघाला.

विसावे शतक-

१९११ – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोलकाता येथील अधिवेशनात जन गण मन हे रविंद्रनाथ टागोर यांनी रचलेले गीत प्रथमच म्हणण्यात आले. २४ जानेवारी १९५० रोजी या गीताला हे भारताचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाली.

१९१८ – बृहद् पोलंड (ग्रांड डची ऑफ पोझ्नान)मध्ये पोलिश लोकांचे जर्मन सत्तेविरूद्ध बंड

१९४५ – २९ देशांनी केलेल्या करारानुसार जागतिक बँक (World Bank) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) यांची स्थापना करण्यात आली.

१९४५ – कोरियाची फाळणी.

१९४९ – इंडोनेशियाला नेदरलॅंड्सपासून स्वातंत्र्य.

१९७८ – ४० वर्षांच्या हुकुमशाहीनंतर स्पेन प्रजासत्ताक.

१९७५ – बिहारमधील (आताचे झारखंड) चासनाला येथे कोळशाच्या खाणीत अचानक पाणी शिरून झालेल्या दुर्घटनेत ३७२ कामगार काही मिनिटांत ठार झाले.

१९७९ – अफगाणिस्तानमध्ये सोवियेत संघराज्याने बब्रक कर्मालला अध्यक्षपदी बसविले.

१९८५ – पॅलेस्टाईनच्या अतिरेक्यांनी रोम व व्हियेनाच्या विमानतळावर २० प्रवाश्यांना ठार मारले.

१९८६ – अफगाणिस्तानमध्ये तालिबानने बाग्रामचा विमानतळ काबीज केला.

एकविसावे शतक-

२००७ – पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांची गोळ्या घालून हत्या.

जन्म-

१५७१ – योहान्स केप्लर, जर्मन खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ.

१६५४ – जेकब बर्नोली, स्विस गणितज्ञ.

१७१७ – पोप पायस सहावा.

१७७३ – जॉर्ज केली, इंग्लंडचा शास्त्रज्ञ, शोधक व राजकारणी.

१७९७ – मिर्झा गालिब, उर्दू कवी.

१८२२ – लुई पास्चर, फ्रांसचा शास्त्रज्ञ.

१८७६ – भास्कर वामन भट, इतिहास संशोधक.

१८९८ – पंजाबराव देशमुख, स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री, विदर्भात त्यांनी केलेले शिक्षणप्रसाराचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटलांच्या तोडीचे मानले जाते.

१९०१ – मार्लिन डीट्रीच, जर्मन अभिनेत्री.

१९२३ – श्री. पु. भागवत, प्रकाशक, समीक्षक, संपादक, लेखक व प्राध्यापक.

१९२४ – सुमती देवस्थळे, मराठी लेखिका.

१९४४ – विजय अरोरा – हिंदी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता.

१९६५ – सलमान खान, भारतीय चित्रपट अभिनेता.

मृत्यू-

४१८ – पोप झोसिमस.

१९०० – विल्यम जॉर्ज आर्मस्ट्रॉंग, ब्रिटीश स्थापत्यशास्त्री.

१९६५ – देवदत्त नारायण टिळक, मराठी साहित्यिक, संपादक, ज्ञानोदय.

१९९७ – मालती पांडे-बर्वे, मराठी भावगीत गायिका.

२००२ – प्रतिमा बरुआ-पांडे, असमी लोकगीत गायिका.

२००५ – केरी पॅकर, ऑस्ट्रेलियाचा उद्योगपती आणि क्रिकेट प्रायोजक.

२००७ – बेनझीर भुट्टो, पाकिस्तानी पंतप्रधान.

प्रतिवार्षिक पालन-

जागतिक बँक वर्धापन दिन

राष्ट्रगीत-

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

प्रतिज्ञा-

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.

जय हिंद

प्रार्थना-

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे

जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे

जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे

समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे

कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे

प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे

असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे

भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे

असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे

कवी :- साने गुरुजी

बोधकथा-

बढाईखोर माणूस –
एक माणूस फार वर्षे प्रवास करून आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिल्या हे त्याने आपल्या शेजार्‍या पाजार्‍यांना तिखट मीठ लावून सांगितले.
अगदी शेवटी एक थाप ठोकून दिली की, ‘मी अलकावतीला गेलो असता तेथील लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारतात पण त्यांनी माझ्याशी पैज लावली असता माझ्याइतकी उंच उडी एकालाही मारता आली नाही.
ऐकणार्‍या कोणालाही ही गोष्ट खरी वाटली नाही. तेव्हा त्यांची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शपथा घेऊन लागला. त्या वेळी त्या लोकातील एक माणूस त्याला म्हणाला, ‘अहो, अशा शपथा कशाला घेता. हातच्या कंकणाला आरसा कशाला ?
या वेळी तुम्ही अलकावतीला आहात असं समजून तिथे जशी उडी मारली तशी इथंही मारून दाखवा म्हणजे झालं. हे ऐकताच त्या बढाईखोर माणसाचे तोंड ताबडतोब बंद झाले.
तात्पर्य – आपण प्रवासात पाहिलेल्या गोष्टी फुगवून सांगण्याची काही लोकांना सवय असते, पण एखादेवेळी त्यांचेच बोलणे त्यांच्या गळ्यात येऊन त्यांची फजिती झाल्याशिवाय राहात नाही.

पसायदान-

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

देशभक्तीपर गीत-

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो

हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो

वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो

हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो

करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो

या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो

ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो

कवी : साने गुरुजी

बालगीत-

ए आई मला पावसात जाउ दे

ए आई मला पावसात जाउ दे
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे

मेघ कसे बघ गडगड करिती
वीजा नभातुन मला खुणविती
त्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचु दे

बदकांचा बघ थवा नाचतो
बेडुक दादा हाक मारतो
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करु दे

धारेखाली उभा राहुनी
पायाने मी उडविन पाणी
ताप, खोकला, शिंका, सर्दी, वाट्टेल ते होऊ दे

कवयित्री : वंदना विटणकर

डॉ.पंजाबराव देशमुख

पंजाबराव देशमुख यांचा जन्म पापऴ या अमरावती जिल्ह्यातील छोट्याशा गावात झाला आहे. २७ डिसेंबर इसवी सन १८९८ रोजी पंजाबराव देशमुख यांनी एका क्षत्रिय मराठा कुटुंबामध्ये जन्म घेतला. पंजाबराव यांचा मूळ आडनाव कदम असं होतं. भाऊसाहेब हे पंजाबराव देशमुख यांचे टोपण नाव होतं.

शिक्षण-

घरामध्ये अठरा विश्व दारिद्र्य होतं. घराची आर्थिक परिस्थिती अतिशय खालावलेली होती. तरीही पंजाबराव देशमुख यांनी शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. गावातल्याच शाळेमध्ये पंजाबराव देशमुख यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं. पुढील शिक्षणासाठी ते कारंजा लाड आणि सोनगाव येथे गेले. येथे अमरावती मधील हिंदू हायस्कूल आणि पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात पंजाबराव देशमुख यांनी त्यांच्य पुढील शिक्षण पूर्ण केलं.
त्याकाळी भारतामध्ये उच्च शिक्षण उपलब्ध उच्चशिक्षणासाठी इंग्लंडला जावं लागलं. परंतु त्यांच्या घरची परिस्थिती इतकी ही चांगली नव्हती की ते इंग्लंडला अभ्यासासाठी जाऊ शकतील परंतु कसेबसे त्यांनी पैसे जमा केले आणि इंग्लंड गाठलं. उच्चशिक्षणासाठी पंजाबराव देशमुख यांनी इंग्लंड तर गाठलं परंतु, तिकडच्या बदललेल्या वेळा, हवामान, नवीन माणसे या सगळ्याशींच त्यांना मिळतंजुळतं करवून घ्यायची गरज होती.
पंजाबराव देशमुख यांनी संस्कृत मध्ये पदवी मिळवली. यांच्याकडे बॅरिस्टरची पदवी देखील आहे. वैदिक साहित्यामधील धर्मातील मूळ विकास यावर त्यांनी डॉक्टरेट ही पदवी मिळाली.

लग्न-

इसवी सन १९२४ मध्ये पंजाबराव देशमुख यांचा विवाह सुवर्ण समाजातील विमल वैद्य यांच्याशी झाला. हा विवाह एक आंतरजातीय विवाह ठरला.

सामाजिक कार्य-

डॉक्टर पंजाबराव देशमुख एक सामाजिक कार्यकर्ते होते. समाजाची सेवा करून समाजामध्ये प्रबोधन घडवून आणण्याचे काम पंजाबराव देशमुख यांनी केले. समाजसेवेची मशाल हाती घेतलेल्या पंजाबराव देशमुख यांनी अस्पृश्यांना योग्य ती वागणूक मिळावी म्हणून संपूर्ण आयुष्यभर लढा दिला. अमरावतीच्या अंबाबाई मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश दिला जात नव्हता यासाठी १८ ऑगस्ट १९२८ रोजी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी सत्याग्रह सुरू केला.
त्या काळी उच्च-नीच, जातिभेद, अस्पृश्यांना मिळणारी गैर वागणूक, उच्चवर्णीय व कृष्णवर्णीय यांवर होणारा भेदभाव या सगळ्या गोष्टी फार चालायच्या आणि ह्याच गोष्टींना आळा घालण्याचं काम डॉक्टर पंजाबराव देशमुख करत होते. अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश मिळू नये म्हणून उच्चवर्णीयांनी निषेध केला होता. परंतु डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी सत्याग्रह सुरू केला. या सत्याग्रह मध्ये भीमराव आंबेडकर यांचा पाठिंबा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना मिळाला.
या कार्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख यशस्वी ठरले मंदिराच्या व्यवस्थापनाने अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश दिला. त्या वेळी अस्पृश्यांना दिली जाणारी वागणूक अतिशय चुकीची होती. समाजामध्ये समानता आणण्यासाठी पंजाबराव देशमुख यांनी रक्ताचं पाणी केलं. समाजसेवक म्हटलं तर ते नेहमीच समाजाच्या भल्याचा विचार करतात. समाजामध्ये असणाऱ्या चुका दुरुस्त करून समाजाला विकासाच्या मार्गावर कस आणता येईल याचा विचार करतात. समाजाचा विकास, समाजाचं हित हेच समाजसेवकांच ध्येय असतं.

शिक्षणाचे कार्य-

आपल्या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं रोपट पेरण्याचे काम डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केल.
सर्वांनी शिक्षण घेऊन राज्याचा, देशाचा विकास साधावा अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी इसवी सन १९३१ मध्ये अमरावती येथे शिवाजी एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. हि एक शिक्षण संस्था आहे आणि शिक्षण संस्था महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची शिक्षण संस्था ठरली आहे. या शिक्षण संस्थेमध्ये २४ पदवी महाविद्यालय तर ५४ इंटरमीडिएट महाविद्यालय आहेत.शेतकरी जगाचा पोशिंदा मानला जातो.
इसवी सन १९५२ ते १९६२ पर्यंत डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात भारताचे पहिले कृषीमंत्री म्हणून अतिशय निष्ठेने व जबाबदारीने सेवा दिली.
पंजाबराव देशमुख यांना शिक्षणा बद्दल फारच हेवा वाटायचा. शिक्षण हे सर्वांनीच घेतल पाहिजे अशी त्यांची इच्छा होती आणि म्हणूनच प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांच्यामध्ये काही अडचण येऊ नये म्हणून त्यांनी ही संघटना स्थापन केली. “भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा सेवाभाव धरा” हे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे ब्रीदवाक्य होते.

मराठी परिपाठ,

परिपाठ सुविचार,
Marathi paripath pdf,
परिपाठ दाखवा,
परिपाठ म्हणजे काय?,
Marathi paripath sutrasanchalan,
आजचा दिनविशेष,
दिनविशेष,
आजचा दिनविशेष मराठी,
मराठी दिनविशेष,
इतिहासातील जागतिक दिवस,
ठळक घटना,
वाढदिवस,
स्मृती दिवसांची संदर्भासहित
Exit mobile version