30 डिसेंबर दिनविशेष
सप्तरंगी परिपाठ
आज वार- शुक्रवार , दिनांक- 30/12/2022,
मिती- पौष शुक्ल अष्टमी, शके-1944
सुविचार- सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून वेळ आल्यावर कृती करण्याची गोष्ट आहे.
आजचा दिनविशेष-
30 डिसेंबर १९७१ – विक्रम साराभाई, भारतीय अंतराळतज्ञ यांचा मृत्यु
ठळक घटना आणि घडामोडी
एकोणिसावे शतक-
१८०३ – अंजनगाव सूर्जी येथे शिंदे व इंग्रज यांच्यात तह.
१८५३ – गाड्सडेन खरेदी – अमेरिकेने गिला नदीच्या दक्षिणेची व रियो ग्रान्देच्या पश्चिमेची ७७,००० वर्ग किलोमीटर जमीन मेक्सिकोकडून १,००,००,००० डॉलरच्या बदल्यात विकत घेतली.
१८६२ – अमेरिकन यादवी युद्ध – यु.एस.एस. मॉनिटर उत्तर कॅरोलिनातील केप हॅटेरास जवळ बुडाली.
१८८० – ट्रान्सवाल प्रजासत्ताक झाले. पॉल क्रुगर अध्यक्षपदी.
१८९६ – फिलिपाईन्सची राजधानी मनिलामध्ये होजे रिझालला फायरिंग स्क्वॉडने मृत्यूदंड. (पहा – रिझाल दिन).
१८९७ – नातालने झुलुलॅंड बळकाविले.
विसावे शतक-
१९०३ – शिकागोच्या इरोक्वो थियेटरला आग. ६०० ठार.
१९२२ – सोवियेत संघराज्याची स्थापना.
१९२४ – एडविन हबलने जगात अनेक आकाशगंगा असल्याचा दावा सिद्ध केला.
१९२७ – एशियातील सगळ्यात जुनी भुयारी रेल्वे, गिंझा लाईन टोक्योमध्ये सुरू.
१९४० – कॅलिफोर्नियातील पहिला द्रुतगतीमार्ग, अरोयो सेको पार्कवे खुला.
१९४३ – नेताजी सुभाषचंद्र बोसनी अंदमान आणि निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेर येथे पहिल्यांदा स्वतंत्र भारताचा ध्वज फडकाविला.
१९४४ – ग्रीसचा राजा जॉर्ज दुसऱ्याने राज्य सोडले.
१९४७ – रोमेनियाचा राजा मायकेलने राज्य सोडले.
१९५३ – जगात पहिल्यांदा रंगीत दूरचित्रवाणी संच अमेरिकेत विक्रीला. किंमत – १,१७५ डॉलर.
१९६५ – फर्डिनांड मार्कोस फिलिपाईन्सच्या अध्यक्षपदी.
१९७२ – व्हियेतनाम युद्ध – अमेरिकेने उत्तर व्हियेतनामवरील बॉम्बफेक थांबविली.
१९९६ – आसाममध्ये बोडो अतिरेक्यांनी रेल्वेत बॉम्बस्फोट घडवून आणला. २६ ठार.
१९९७ – अल्जीरियात अतिरेक्यांनी चार गावातील ४०० लोकांना ठार मारले.
एकविसावे शतक-
२००० – मनिलात काही तासात अनेक बॉम्बस्फोट. २२ ठार, १०० जखमी.
२००१ – आर्जेन्टिनात ब्युएनोस एर्सच्या रिपब्लिका क्रोमेन्योन नाईटक्लबमध्ये आग. १९४ ठार.
२००४ – भारत व एशियन गटाच्या देशांदरम्यान व्यापारी सहकार्य व शांततेचा करार.
जन्म-
३९ – टायटस, रोमन सम्राट.
१६७३ – तिसरा एहमेद, ऑट्टोमन सुलतान.
१८६५ – रुड्यार्ड किप्लिंग, ब्रिटीश लेखक. मोगलीच्या कथा, कुमाऊंचे मानवभक्षक,जंगल बुक इ. लिहीले.मुंबईत जन्म.
१८७९ – रमण महर्षी, भारतीय तत्त्वज्ञानी.
१८८४ – हिदेकी तोजो, दुसऱ्या महायुद्धातील जपानी पंतप्रधान.
१८८७ – कनैयालाल माणेकलाल मुन्शी, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, कायदेतज्ञ, गुजराती साहित्यिक.’भारतीय विद्याभवन’चे संस्थापक.
१९०२ – डॉ. रघू वीरा, भारतीय भाषाशास्त्रज्ञ, जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, घटनासमितीचे सदस्य.
१९३५ – ओमार बॉन्गो, गॅबनचा राष्ट्राध्यक्ष.
मृत्यू-
१५९१ – पोप इनोसंट नववा.
१८९६ – होजे रिझाल, फिलिपाईन्सचा क्रांतिकारी.
१९७४ – शंकरराव देव, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा नेता व महात्मा गांधींचे सहकारी.
१९८२ – दत्ता उर्फ दादा धर्माधिकारी मराठी चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक.
१९८६ – हॅरोल्ड मॅकमिलन, ब्रिटनचा पंतप्रधान.
१९८७ – दत्ता नाईक ऊर्फ एन. दत्ता, भारतीय संगीतकार
१९९२ – शाहीरतिलक पिराजी रामजी सरनाईक, मराठी शाहीर.
२००१ – हर्षद महेता, भारतीय शेरदलाल.
२००६ – सद्दाम हुसेन, इराकी राष्ट्राध्यक्ष.
प्रतिवार्षिक पालन-
रिझाल दिन – फिलिपाईन्स.
राष्ट्रगीत-
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
प्रतिज्ञा-
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद
प्रार्थना-
बोधकथा-
तात्पर्य :
मन शांती महत्वाची आहे.
पसायदान-
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥